प्रतिनिधी लोणी काळभोर
एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली.त्यामुळे मराठी माणूस वाचवायचा असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे...असे उद्धव ठाकरे गटातील शिवाजी काळभोर व इतर कार्यकर्ते म्हणत आहेत. हिच योग्य वेळ आहे..असे ते यावेळी बोलत होते
महाराष्ट्र राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असणाऱ्या शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचा आज जाहीर निकाल लागला.त्यामधे शिंदे गटाला मूळ शिवसेना मान्यता मिळाली.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत.त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे.
राजकारणात काहीही होऊ शकतं, असं बोलतात. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात असलेले ठाकरे बंधू आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार चर्चिला जातो. विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीयात जवळीक वाढत असल्याचं दिसतंय. शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची केलेली पाठराखण असो वा एका घरगुती कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणं असो. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद कायम उमटत असतात. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही भाऊ एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे राजकारणातही हे दोघे एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतील का? असा प्रश्न सारखा चर्चेत येतो. अर्थात या चर्चा सुरु होण्यामागे देखील काही ठरावीक कारणं आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रभावशाली व्यक्तीमत्व आहेत. ते त्यांच्या धडाकेबाज स्वभाव आणि भाषण शैलीमुळे राज्यातील लाखो तरुणांच्या मनात आहेत. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या वाईट राजकीय परिस्थितीतून जात आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांचे भाऊ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. पण गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही भावांमध्ये दुरावा आला आहे.