शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन (अमृत महोत्सव) मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अँड. संदीप कदम (अधिसभा सदस्य, सा. फुले पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढलेल्या रॅलीच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्था अधीक्षक सीताराम अभंग, संशोधन अधिकारी देशपांडे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम प्रमुख प्रा. अरूण शिंदे, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. योगेश पवार, क्रीडा शिक्षक प्रा.अनिल दाहोत्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.नीता कांबळे, विदयार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. आदिनाथ पाठक, रा.सेवा योजना प्रमुख डॉ.भरत राठोड, प्रा. प्रिया आरडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी उपस्थितांना ध्वज शपथ देत, अमृत महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. महाविद्यालयात सुरू झालेल्या नवीन व्यावसायिक शिक्षणाचा फायदा घेत स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर झाले पाहिजेत असेही यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सविव ऍड. संदीप कदम यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताने मागील ७५ वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये खूप प्रगती केली असून ही प्रगती करताना यामध्ये खूप जणांचे योगदान आहे. भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान केले त्या सर्वांचे स्मरण करणे व त्यांचे बलिदान लक्षात ठेवणे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही ऍड.संदीप कदम यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विदयार्थीनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण, समाजएकजूटीचे, आरोग्य, पर्यावरण इ. विषयी वेगवेगळे संदेशफलक हाती घेऊन कोथरूड परिसरात प्रभात फेरी रॅलीचे अयोजन करण्यात आले. या रॅलीचे यशस्वी नियोजन करणेसाठी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय विभागातील प्राध्यापक व सर्व प्रशासकिय सेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.