अलंकापुरीत माऊलींचे अश्वांचे हरिनाम गजरात आगमन
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
माऊलींचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून सुमारे ११ दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात बुधवारी ( दि.१८ ) दाखल झाले.
पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी सरदार बिडकर वाड्यातील श्री गोपालकृष्ण मंदिरात आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि अश्वसेवेचे मालक उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला. श्रीकरून मंदिरात दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
श्रींचे अश्वाचें अंकली ( ता. चिकोडी, बेळगावी,कर्नाटक ) येथील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. अलंकापुरीतील अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन झाले. येथे विसावा झाला. परंपरेने हरप्रीतसिंग बिडकर सरदार, उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांचे तर्फे पूजा व स्वागत करण्यात आले. आळंदी ग्रामस्थांचे वतीने तसेच ह. भ. प. हैबतरावबाबा आरफळकर यांच्या दिंडीने जात आळंदीकर ग्रामस्थ, दिंडी आणि आळंदी देवस्थानचे वतीने उत्साहात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले.
बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने येत प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा झाली. यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार, महादजीराजे शितोळे सरकार, आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, चोपदार रामभाऊ रंधवे, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, ज्ञानेश्वर गुळुंजकर आदीसह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. माउली मंदिरात परंपरेने श्रींचे अश्वांचे स्वागत देवस्थान तर्फे करण्यात आले. मंदिर प्रदक्षिणा करून अश्व मुक्कामाचे ठिकाणी हरिनाम गजरात पोहोचले. आळंदी शहर काँग्रेसचे वतीने अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी स्वागत करीत नगरपरिषद चौकात अश्वांचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली.
सनईचे वादनात, हरीनाम गजर आणि भाविकांनी अश्व दर्शनास गर्दी केली होती. अश्व माउली मंदिरात आले. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने श्रींचे अश्वांचे स्वागत करण्यात आले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली. मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. अश्व पूजे नंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहचले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जावून अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला. यावेळी माउली गुळुंजकर, अजित मधवें आदी त्यांचे समवेत होते.