सुनील भंडारे पाटील
वाघोली राहू मार्गावर चार चार ट्रेलर जोडून अपघाताला निमंत्रण
देणाऱ्या ऊस वाहतूक बेकायदेशीर वाहनांवर कडक कारवाई करा अशी मागणी रयत
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी केली आहे,
संबंधित मार्गावर पुढे राहू तालुका दौंड येथे उसापासून गुळ तयार
करणाऱ्या शेतकऱ्यांची अनेक गुऱ्हाळे आहेत, सद्यस्थितीत हवेली आणि शिरूर
भागातून ऊस विकत घेऊन ट्रॅक्टर वाहतुकेमार्फत राहू येथील गुऱ्हाळावर ऊस
पोचवला जातो, परंतु या ट्रॅक्टर वाहतूकदारांना कसलीच शिस्त नाही, चार चार
ट्रेलर जोडून ट्रॅक्टर या मार्गाने जातात, चार टेलर जोडणे म्हणजे अंतर
खूप आहे, पुढे ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरला एवढ्या लांबचा पाठीमागचा
अंदाज कसा येणार,
परिणामतः लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, शिवाय
अशा वाहतुकीसाठी कुठलीच परवानगी नसताना, अवैध स्वरूपाची वाहतूक या
मार्गावर केली जात आहे, अशा अवैध वाहतुकीमुळे अष्टापुर फाटा, व या
मार्गावरील अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत, अनेक अपघाती मृत्यू देखील
झालेत, विचार करण्यासारखे आहे की, चार ट्रेलर जोडलेला ट्रॅक्टर चौकात,
गावात, वळण रस्त्याच्या ठिकाणी वळण कसे मारणार, त्यामुळे अपघात तर होतीलच,
परंतु जास्त उंचीवर भरलेला ट्रेलर कधी कधी एखाद्याच्या अंगावर पलटी पण होऊ
शकतो, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, वाहतूक नियंत्रण खाते मात्र याकडे
दुर्लक्ष करीत आहे, समाज कल्याण साठी, वाहतूक नियंत्रण खाते, पोलीस स्टेशन
यांनी अशा स्वरूपाच्या अवैध वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी रयत शेतकरी
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी केली आहे,