धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर नाशिककडे प्रस्थान

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
                अखंड हिंदूस्थानचे  आराध्य दैवत स्वराज्याचे धाकलधनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पायी पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर नाशिकच्या दिशेने प्रस्थान झाले,      
   धर्मवीरपीठ, शक्तिपीठ, बलिदान पीठ, श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळावरून दरवर्षी 15 दिवस कालावधी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे काल शुक्रवार ता 6 रोजी त्र्यंबकेश्वर नाशिक कडे प्रस्थान झाले, दरवर्षी  नियमित जाणारे या पालखी सोहळ्यात वारकरी, तरुण,आबाल,वृद्ध, महिला मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात, धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळापासून टाळ मृदंगाच्या गजरात  मोठ्या उत्साहात पालखी निघाली हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती,        
    या पालखी सोहळ्यासाठी वढू बुद्रुक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अंदाजे 6 लाख रुपये किमतीचा सुंदर असा रथ बनवला आहे, या रथाच्या बैल जोडीचा मान गोपीनाथ बाळासाहेब भंडारे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे, हा पालखी सोहळा गुरुवार ता 19 ला त्र्यंबकेश्वर नाशिक श्री निवृत्ती महाराज समाधी येथे पोहोचणार आहे,          
       पंधरा दिवस चालणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी वढू बुद्रुक व पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी नागरिकांनी धर्मवीर शंभूराजे प्रतिमा, अन्नदान, ट्रॅक्टर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बॅटरी जनरेटर, ओळखपत्र सुविधा, अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ते त्र्यंबकेश्वर नाशिक पायी पालखी सोहळ्याची परंपरा अनेक वर्षाची असून भावी पिढीसाठी ही एक मोठी प्रेरणा आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 25, June 2025