पलांडे आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Bharari News
0

शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला

             मुखई येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै.संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा  संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
         
       मुखई येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे व उपस्थित मान्यवर.(छाया : नमीरा डिजीटल)
 
  लॉकडावूनच्या कालखंडानंतर हा आनंदाचा क्षण शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना व पालकाना अनुभवता आला. गुणवत्तेचा ध्यास असणारी ही संस्था व शाळा सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नव-नवीन उपक्रम राबवत असते. लॉकडावूनच्या कालखंडात अविरत ऑनलाईन शिक्षण चालू असणारी शाळा म्हणून शाळेची ओळख पुणे जिल्ह्यात झाली त्यामुळे गुणवत्तेचा आलेख शाळेचा सातत्याने वाढत आहे. १० वी १२ वी चा शाळेचा निकाल सलग १५ वर्षापासून १०० टक्के लागला आहे.  एसएससी परीक्षेतील प्रथम क्रमांकाचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-  प्रथम - वैष्णवी पोपट वनवे (९७.८० टक्के),  द्वितीय - संस्कार किशोर गोगावले - ९४.६०टक्के),  तृतीय - वंशिका कानिफनाथ शिंदे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, उपाध्यक्ष सुभाष  पलांडे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे,  शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,  सचिव प्राचार्य रामदास थिटे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, विष्णू मुंजाळे, संस्थेचे संचालक बबन पलांडे,  राजाभाऊ पलांडे, खुशाल पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम शिरसाट  यांनी केले. भटक्या विमुक्त जाती जमातील विद्यार्थ्यांना एवढे दर्जेदार शिक्षण या आश्रम शाळेत संस्थेच्या माध्यमातून दिले जाते ही बाब खरोखर अभिमानाची असल्याचे याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे यांनी यावेळी बोलताना खडतर मार्गाने झालेल्या संस्थेच्या वाटचालीचा लेखा-जोखा मांडला. उच्च गुणवत्तेसाठी संस्था, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य रामदास थिटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एवढ्या यशावरच न थांबता आपल्याला उत्तुंग भरारी मारायची आहे असे सांगून प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोगावले सर व जाधव सर यांनी केले तर काळे मॅडम यांनी आभार मानले.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!