वडगाव काशिंबेग व साकोरे या दोन गावांना जोडणाऱ्या घोड नदीवरील पुलाचे व सुलतानपूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते

Bharari News
0
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
         .३२  वर्ष  विधी मंडळात काम करत असताना यांना मी राजकारणापेक्षा समजकरणालाच अधिक प्राधान्य दिलं. असे प्रतिपादन दिलीप वळसे पाटील यांनी केले 
    ते पुढे म्हणाले सामान्य जनता केंद्र बिंदू म्हणून त्यांचे प्रश्न सोडविले.विकास निधी वाटप करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मंत्रीपद येते व जाते. सत्तेत असो किंवा नसो आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा वेग कायम ठेवला जाईल. याबाबत जनतेने व कार्यकर्त्यांनी निर्धास्त रहावे. असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.   
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथे वडगाव काशिंबेग व साकोरे या दोन गावांना जोडणाऱ्या घोड नदीवरील सात कोटी २१ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे व सुलतानपूरकडे जाणाऱ्या एक कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे होते. यावेळी कार्यकारी अभियंता आर.वाय पाटील, उपअभियंता सुरेश पठाडे, कात्रजचे संचालक विष्णू हिंगे, मा. जि. प.सदस्या .अरुणा थोरात, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,श्रीराम देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शांताराम भय्ये,उद्योजक जगदीश पिंगळे, राम डोके, कंत्राटदार डी.बी लाळगे उपस्थित होते. पुलाच्या पुढील रस्त्यासाठी डोके कुटुंबाने एक एकर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात भास्कर डोके यांचा सत्कार करण्यात आला.
“येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय इमारत व मोरया देवस्थान ट्रस्टला “ब” वर्ग दर्जा मिळून द्यावा.” अशी मागणी शंकर पिंगळे यांनी केली.” बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,  जि. प.मा. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची मनोगते झाली. बाळासाहेब पिंगळे यांनी प्रास्ताविक व बाळासाहेब शिंदे, महेश डोके यांनी सूत्रसंचालन केले.
“1990 पूर्वी आंबेगाव तालुक्यात डिसेंबर नंतर जवळपास सर्वच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पहिल्या विधानसभा निवडणूक प्रचारात आंबेगाव तालुक्याचा मी कायापालट करणार असे आश्वसन देऊन कार्यवाही केली.हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) बांधकाम, उजवा, डावा कालव्याच्या कामाला गती, घोड व मीना नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले. शेतकरी कष्ट करून भरघोस शेती व दुधाचे उत्पादन घेतात. याचा सार्थ अभिमान आहे.असे गौरवद्वार 
दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!