सुनील भंडारे पाटील
गेल्या अनेक दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वड बुद्रुक तालुका शिरूर आणि परिसरातील गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तरकारी पिके पूर्णपणे हातातून गेलेली आहेत, उत्पादन खर्च, व पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे,
सतत पडत असलेला पावसामुळे, तसेच ढगफुटी पावसामुळे टोमॅटो, कोथंबीर, भेंडी, मेथी व इतर अनेक तरकारी पिके पूर्णपणे पाण्यात नाहीशी झालेत, पिकामध्ये अजूनही गुडघ्या,पोटरी एवढे पाणी साठलेले आहे, आकाश गेले दोन महिने ढगाळमय असल्याने सूर्याचे दर्शन देखील होत नाही, अशा वातावरणाचा सर्वच शेती पिकावर परिणाम झाला असून, शेतीमध्ये सर्वात समजले जाणारे म्हणजे कोडगे पिक ऊस यावर देखील या वातावरणाचा मोठा परिणाम झाल्याचे परिसरात दिसत आहे, अगोदरच शेती पीक उत्पादनासाठी भरमसाठ खर्च आणि या बदलत्या वातावरणामुळे उत्पादन शून्य झाले आहे, त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, एकंदरीत आर्थिक टंचाईत शेतकऱ्याचे कंबरडे मोडल्यासारखी परिस्थिती झाली आहे,
अतिवृष्टी पावसामुळे तरकारी पिके, सडून जळून गेलेत, जीव लावून आणलेल्या पिकांना देखील तेजी कमी आहे, त्यामुळे चोखंदळ ग्राहकांच्या अपमानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती शिरूर आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे,