सुनील भंडारे पाटील
गावोगावीआजमितीला १५ % व्यसनाधीन मुले लग्नाविना बेकार भटकत आहेत . यातीत बरेचशे -लोकांच्या वरातीत वा कुठल्याशा मिरवणुकीत खाऊनपिऊन नशेत डिजेपुढे लुंगीडान्स केलेले वा नेते पुढाऱ्यांबरोबर ढाब्यावर फुकाचे जेवताड सापडतील . दारु गांजा गुटखा अशा साऱ्या व्यसनांच्या आहारी जाऊन या बेकार टुकारांना कोण देणार पोरी ? पण अलिकडे बंगलो प्लॉट जमीनीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंट प्रमाणे पन्नासेक हजार कमीशन घेवून सोयरीकीचा मध्यस्थीचा व्यवसाय करणारे दलाल पैदा झालेत . विदर्भमराठवाड्यातील गोरगरीबांच्या मुलींना असे खाटकांच्या दावणीला बांधले जाते , त्यातल्या काही दागीने घेऊन लागलीच फरार होतात, काही सुसंस्कारीत मुली बापाच्या नावासाठी हालअपेष्टा यातना सोसत टिकतातही गावातील एका पानपट्टीचे दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्ष वय असलेल्या एका बेकार तरुणाला विचारले, कारे ...
काही नोकरी धंदा करून कमवत का नाहीस ?दिवसभर दारू पिऊन गुठका खात थुंकत असतोस !
*तो बोलला : माझी मर्जी !*
त्याला विचारण्यात आलं : लग्न झालंय का ?
*तो बोलला : झालंय.*
मी विचारले : कसं केलंस ?
तो म्हणाला : मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रमकार्ड द्वारे तीस हजार मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळतात.
मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरिता तरी थोडंफार कमवावं लागणारच ना?
तो म्हणाला : "जननी सुरक्षा" योजनेत प्रसूती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोय आणि "श्रम कार्ड" योजनेत "भगिनी प्रसूती योजनेद्वारे" वीस हजार रुपये मिळतात.
मी म्हटलं :मुलांच्या शिक्षणाकरता तरी कमावशील की नाही ?
गुटख्याची पिचकारी मारत तो म्हणाला, त्यांच्या करीतातर सरकारतर्फे शिक्षण, गणवेश, वह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळतेच शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दर वर्षी पैसे सुद्धा मिळतात.आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा BPL द्वारे मोफत प्रवेश आणि स्कॉलरशीप सुद्धा मिळते. मग टेंशन कशासाठी घ्यायचं !
मी विचारलं, घर खर्चाचं काय ?
तो म्हणाला, लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉपही मिळालाय.
आईवडिलांना वृद्धावस्था पेन्शन मिळतेय आणि एक रुपया किलो दराने गहू तांदूळ मिळतात.
मी म्हणालो, अरे आईवडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी तरी काही कमव.
तो म्हणाला, "मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुध्दा!*
मी म्हटलं, त्यांच्या म्हातारपणचे आजारपणासाठी तरी कमव !
तो म्हणाला, "आयुष्यमान कार्ड" द्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपाय मिळतात.
*मला त्याचा राग आला. म्हटलं, आईवडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी कमव.
तो म्हणाला, अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडंबी सरकार मोफत देतंय.
मी म्हटलं, अरे मुलांच्या विवाहाकरीता तरी कमव.*
तो हसला आणि म्हणाला, पुन्हा तोच प्रश्न !*
*जसा माझा विवाह झाला तसाच त्यांचाही होणार!*
*मी म्हटले मित्रा, मला एक गोष्ट सांग. तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस ? तो म्हणाला, सरकारी जमिनीवर अतिक्रममण कर, घर बांध, कर्ज घे आणि घर विकून पैसा कब्जात घे. कधी कुणाची मोटर चोर .. ?
तुमच्या सारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरीता टॅक्स भरत आहेत. शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहेत आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे. मग आम्ही कशाला कामं करायची ?
निट मनापासून विचार केला तर
जेणेकरून सरकारला कळेल की जनतेच्या कष्टाच्या पैशावर सरकार लोकांना सुस्त आणि ऐतखाऊ बनवत तर नाहीना ? नेते पुढारी या पोरांना फक्त निवडणुकीपुरते धाब्यावर पोसतात . दारु गांजा गुटखा पुरवतात . पुढे फुकटची आदत लागून पोरं व्यवसनाधीन बरबाद होतात . तिसीवर वय झाले तरी लग्न होत नाहीत . इंदूरीकर महाराजांच्या डायलाँग प्रमाणे ते गोसावीबी बनू शकत नाहीत . आणी त्या अतिहुशार ऐतखाऊ प्रमाणे सोयी सुविधा मिळवून ऐषही करू शकत नाही . सगळी कडूनच आडक्यात पाय !