सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर बलिदान मास आज पासून समाधी स्थळ तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज पासून पाळण्यात आला आहे, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवशी सुरू झालेल्या धर्मवीर बलिदान मास मृत्युंजय अमावस्येपर्यंत ( धर्मवीर बलिदान दिन) असा महिनाभर चालणार आहे,
स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सख्खा मेव्हणा गणोजी शिर्केकडून घात झाला, जंजिऱ्याच्या स्वारीवर असताना शंभूराजांना संगमेश्वर (सरदेसाईंचा वाडा) येथे औरंगजेबाने पकडल्यानंतर, शंभूराजे स्वामीनिष्ठ कवी कलश यांना बहादुरगड (धर्मवीरगड) वर आणण्यात आले, धर्म बदलण्यासाठी दोघांनाही अनेकदा विचारण्यात आले, दोघांच्याही तोंडून नाही असे शब्द आल्यावर रोज एक शिक्षा दिली जात होती, जगाच्या पाठीवर कुठलाही राजा एकमेकांशी अशी वागू शकत नव्हता, अशी वागणूक औरंग्याने दिली, रोजची शिक्षा म्हणजे मरण यातना, आजही शिक्षेचे 40 दिवस आठवले तर महाराष्ट्राच्या डोळ्यांना अश्रू येतात, शंभूराजे आणि कवी कलश यांनी 40 दिवसांच्या मरण यातना भोगून अखेर धर्मासाठी मरण पत्करले, हेच ते धर्मासाठी बलिदान झाल्याचे 40 दिवस अखंड महाराष्ट्र तसेच हिंदुस्थानात बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो,
धर्मपीठ,शक्तिपीठ, प्रेरणापीठ, बलिदानपीठ, श्री क्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर), श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळी तसेच संपूर्ण राज्यामध्ये हा महिना धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो, शिवभक्त, शंभू भक्तांच्या वतीने मुंडन करून, रोज सायंकाळी प्रतिमा पूजन, शिव वंदना,शंभू वंदना, ध्येयमंत्र,प्रेरणा मंत्र, राष्ट्र साधना, एका रांगेत उभे राहून घेतली जाते, त्याचप्रमाणे गोड पदार्थ, मांस आहार सेवन वर्ज, चप्पलचा त्याग अनवाणी चालणे, अशा स्वरूपाची पथ्य पाळले जातात, धर्मवीर बलिदान मासाचे नियोजन हे सर्व नियोजन समाधी स्थळ तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हिंदुस्थानात, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने गेल्या अनेक वर्षा पासून करण्यात येते, आज बलिदान मासाचे पहिले पुष्प वाहण्यात आले,