पुणे तिथे काय उणे...! येथे कायदयाचा धाक उरला नाही; पैसा फेको तमाशा देखो गरीबांना न्याय मिळणार कधी

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
           पुण्यामध्ये एका पॉर्शे गाडीने धडक दिल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन इंजिनियर्सचा जागीच मृत्यू होतो. ज्या गाडीने धडक दिली आहे त्यातला श्रीमंत बापाचा पोरगा वेदांत अग्रवाल दारु पिऊन गाडी चालवत असतो. मध्यरात्रीनंतरही रस्त्यावर बऱ्याच गाड्या असताना हा सायको किलर वेदांत कशाचाही विचार न करता नशेत समोरच्या स्कुटीला ठोकतो.
         त्या स्कुटीवर मागे बसलेली मुलगी अश्विनी कोस्टा १५-२० फूट उडून जमिनीवर आदळते आणि गतप्राण होते.ती स्कूटी चालवणारा मुलगा अनिश अवधिया धडक बसल्याने तडफडत असतो.त्याला दवाखान्यात दाखल करेपर्यंत तोही जीव सोडतो.
          इकडे पोलीस आरोपी वेदांतला जमावापासून वाचवून पोलीस ठाण्यात नेतात. आणि तो बड्या असामीची औलाद आहे हे कळताच चक्र फिरतात.रात्री तीन वाजता त्याचा बाप स्थानिक आमदार सुनील टिंगरेला डायल करतो.इतक्या वेगात चक्रे फिरायला लागलेली असतात की सगळी व्यवस्था आता त्या आरोपी सायकोला वाचवण्यासाठी कामाला लागलेली असते. फटक्यात जमानत मिळेल अशी कलमं लावली जातात.रविवारी सुट्टी असूनही मॅटर जर उद्या मीडियात आला तर अवघड होईल म्हणून १५ तासांच्या आत आरोपीला न्यायधीशासमोर हजर करण्याच्या हालचाली सुरू होतात.सगळ्यात आधी आरोपी हा गाडी चालवतच नसल्याचा आव आणला जातो.आणि सोबतचे ड्रायव्हर ऊभे केले जातात.त्यानंतर प्रत्यक्षदर्शी तिथं असल्याने तो बनाव उघडा पडतो म्हणून आरोपी हा अल्पवयीन असल्याचा मुलामा चढवला जातो.दाखल झालेल्या तक्रारीत आरोपी सायको वेदांत हा दारूच्या नशेत आहे हे दडपण्याचा प्रयत्न केला जातो पण त्याने जिथं बसून दारू पिलेली आहे तिथले सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने थातुर मातुर टेस्ट सँपल लॅबला पाठवल्याचे नाटक केले जाते.
              त्याचवेळी वेदांतच्या बापाला पोराला चढलेली दारू उतरण्याची घाई असते.तो त्यासाठी क्रोसीन देतो.त्यानंतर आपलं लेकरू उपाशी असेल म्हणून तेवढ्या पहाटे पिझ्झा आणि बर्गरची व्यवस्था केली जाते.या गोष्टी आरोपीला ठाण्याच्या मागे नेऊन खाऊ घातल्या जातात.आणि त्या रस्त्यावर पडलेले दोन मृतदेह डीस्पोज करून त्यांच्या त्यांच्या आई बापांच्या हाती सोपवण्याची कारवाई करण्याची सुरूवात होते.इकडे न्यायव्यवस्था खडबडून जागी होते.लावलेली कलमे हि जामीन रोखता येणार नाही अशीच असतात.त्यामुळे जामीन दिला जातो.तिथं बसलेला विकलेला न्यायाधीश या सायकोने दोन लोकांचा खून केलाय या जाणिवेचा नसल्याने तो त्या बळी गेलेल्या दोन लोकांचा असा न्याय करतो की अशी शिक्षा आम्ही शाळेत असताना शुद्धलेखन लिहून नाही आणले तर कोलदांडा घालायला लावणाऱ्या शिक्षेपेक्षा सौम्य असते.
           आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितला जातो,ट्रॅफिक पोलिससोबत १५ दिवस काम करणे आणि दारूचे व्यसन सोडण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणे.

जुवेनाईल कायद्यात जर एखाद्या अल्पावयीन मुलाने जर हिनियस क्राईम (अघोरी गुन्हा) केला असेल तर त्याला प्रौढ गृहित धरले जावे अशी तरतूद असल्याने कायदा अशा प्रसंगांना डील करण्यासाठी योग्यच आहे पण जर रस्त्यावर पाडले जाणारे असे खून हे राज्य पुरस्कृत यंत्रणेद्वारे दाबले जात असतील तर अशा कायद्यांचा वापर फक्त गरिबांविरोधात केला जातो का? असा प्रश्न पडतो. साधे सिग्नल तोडले तर कागदपत्रं विचारून ५-५ हजार मागणाऱ्या पोलिसांच्या गाडीची लायसन्स प्लेट नसते, या सायको पोराकडे लायसन्स नाही, हा दारू किती पिला आहे, हा दारु कुठून पिऊन आला आहे, इतक्या रात्री बार कसे काय चालू? आणि याच्या मायबापाची नालायक वृत्ती हे सगळं सोडून याला लवकरात लवकर घरी सुखरूप कसं पोचवता येईल याची व्यवस्था केली जाते.या सगळ्यांवर गृहमंत्री उंटावरून शेळ्या हाकत म्हणत आहेत की व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे का? हे सीसीटिव्ही चेक करून दोषी पोलिसांवर कारवाई करा.

गृहमंत्रीसाहेब इथे त्याला वाचवण्यासाठी तुमची सगळी सिस्टम कामी लागली तरी तुम्ही सीसीटीव्हीत दिसेल तरच कारवाई करा म्हणता? पोलिसांनी जर त्यांचं कर्तव्य योग्य बजावलं आहे तर मग पुरवणी FIR का दाखल करावी लागली? त्यात आरोपीच्या बापाला आरोपी का बनवावे लागले? आरोपीवर नवीन कलमे का लावावी लागली? आरोपी फरार होईपर्यंत पोलीस काय करत होते? सोशल मीडिया नसता तर या गोष्टी झाल्या असत्या का?

तर आताची सद्यस्थिती अशी आहे की सगळेच आरोपी गायब आहेत.पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.उद्या आरोपी अटकही केले जातील.

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी गोरगरीब साक्षीदार बिल्डर विशाल अग्रवालकडून विकत घेतले जातील.एखादा प्रामाणिक पोलीस, न्यायाधीश कर्तव्य बजावत असेल तर त्याला बदलेले जाईल.आमदाराच्या हस्तक्षेपावर काहीच होणार नाही कारण तो सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे.आमच्यासारखे लोक आज बोलत आहेत उद्या थोडे बोलतील.आम्ही अधूनमधून पालघरच्या साधुंवरही बोलतो असतो पण शेवटी विकल्या गेलेल्या या व्यवस्थेत सलमानसारखं हि केस लॉजिकल कन्क्लूजनपर्यंत आरोपींना निष्पाप ठरवत बंद केली जाईल.ज्या कुटुंबाच्या घरातील कमावती पोरं गेली आहेत ते मध्यप्रदेशातून येऊन किती खेटे घालू शकणार आहेत...त्यांना न्यायालयात दिवस दिवस बसवून त्यांची न्याय मिळण्याची आशा मारली जाईल.

या अनुसरून घडलेला एक प्रसंग सांगतो, एकदा मी माझ्या इंदोरमधून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मॅनेजरला विचारलं, "हेमला... तू भारतातून अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय का घेतलास?"
तेव्हा तिचं उत्तर होतं "भेदभाव सगळीकडे होतो, प्रश्न सगळ्यांचे काही सारखे तर काही वेगवेगळे आहेत पण अमेरिकेत सिस्टम सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो आणि येथे माणसांना किड्या मुंग्यांसारखं ट्रिट केलं जात नाही." तेव्हा मला तिच्या बोलण्याची दाहकता समजली नव्हती आज मात्र तिचं उत्तर परत परत आठवत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!