आंबेगाव मिलिंद टेमकर
आढळराव पाटील यांनी सोमवारी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला..आज माध्यमांसमोर बोलताना शिवाजी दादा आढळराव बरसले भावनांचा बांध फुटला. आणि मनातल्या भावना जनात आल्या.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र नसताना खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या (Shivsena) सभापतींवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला. गेली सहा महिने शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. सभापतीची बायको व मुलगी दिवसाआड माझ्याकडे यायच्या आणि ढसाढसा रडायच्या. काय करावं कळायचं नाही. मनाला इतकं वाईट आणि विषण्ण वाटायचं. मी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो. साहेब, सभापतींना किमान जामीनतरी मिळू द्या. कायदा आणि विधी विभाग तुमच्याकडे आहे. खोट्या केसेस आहेत, असे समजावून सांगितले तरीही माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही, अशी खंत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली. .,..
गेल्या तीन साडेतीन वर्षांंमध्ये एका बाजूला माझे पाठीचे दुखणं, डायबेटीस असतानाही मी घरात बसून राहिलो नाही. ज्यांनी कामं करायला पाहिजेत, त्यांनी कामं केली नाहीत. पण, मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन कधी वादळात नुकसान झालेल्या लोकांना खिशातून पैसे काढून मदत केली. कोरोना काळात वैद्यकीय उपचार, अन्नधान्य, किराणा याची मदत केली. मला सत्तेची हाव होती म्हणून मी हे केले नाही. कारण मी खासदारही नव्हतो. पण, ज्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले, त्यांना वाऱ्यावर सोडता येत नव्हतं. ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते घरात स्वतः कोंडून बसले हेाते. हे सर्व उभ्या महाराष्टाने पाहिले आहे, असा आरोपही त्यांनी विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता केला,