नामीबिया मधून 8 चित्ते भारतात दाखल - 70 वर्षानंतर चा सुवर्णक्षण,

Bharari News
1 minute read
0

सुनील भंडारे पाटील

          सुमारे 70 वर्षांपूर्वी 1947 साली आपल्या देशामध्ये नामशेष पावलेला प्राणी चित्ता पुन्हा एकदा देशामध्ये आल्याने हा एक सुवर्णक्षणच म्हणावा लागेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस दिवशी नामीबिया मधून आठ चित्ते आणण्यात आले आहेत, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चित्यांचे फोटो शूट केले,          
आपल्या देशामध्ये शेवटच्या चित्त्याचा मृत्यू 1947 साली छत्तीसगड येथील कोरिया जिल्ह्यामध्ये झाला होता, त्यानंतर चित्ता आपल्या भारत देशाच्या भूमीवर नामशेष पावला होता, भारतामध्ये दाखल झालेल्या 8 चित्या मध्ये 3 नरचित्ते, 5 मादा चित्ते आहेत, त्यांना कूनो नॅशनल पार्क (मध्य प्रदेश) मध्ये सोडण्यात आले आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, यांच्या उपस्थितीत चित्त्यांना अभयारण्यात  सोडले आहे, गेल्या अनेक वर्षापासून देशामध्ये चित्यांचा वावर नाही, आता चित्ते  आपल्याला भारत देशाच्या भूमीवर दिसणार आहेत, अभयारण्य मध्ये सोडण्यापूर्वी चित्क्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यांना आणण्यासाठी मालवाहतूक विमान बोईंग 747 चा उपयोग करण्यात आला, या विमानाच्या तोंडावर चित्त्याचे चित्र प्रिंट करण्यात आले होते, हे विमान सर्वतोपरी अनुकूल करण्यात आले होते, खुल्या जंगलामध्ये, त्यांना शिकार करता आली पाहिजे असे वातावरण तयार करण्यात आले आहे, पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या निगराणी खाली त्यांना ठेवण्यात आले आहे,

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 23, June 2025