सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले
गणेश विसर्जनात ' अग बाय अग बाय अग बाय बाय बाय .. ' तरुणाईला गणेशाचे पावित्र्याचे भान नाय त्त्टमसाँगच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईला ज्ञान विद्या बुद्धीदात्या गणेशाने ही बुद्धी दिली की अती उत्सवी म्होरक्यांनी या पवित्र अशा गणेशोत्सवाला गालबोट लागतेय याचा विचारच केला नाहीसा दिसतोय , असे गावोगावच्या गणेशोत्सवात देवा समोर वाजवलेल्या डिजेच्या गाण्यांवरून दिसते, डीजेचं गाणं लहान मुले तरुणाईला भुरत पाडतेय हे पाच्छात्य संस्कृतीचंआपल्या पवित्र अशा भारतीय संस्कृतीवर झालेलं अतिक्रमण नव पिढी म्हणजेच भारताचे भविष्य उध्वस्त करू पाहते हे कुणाच्या ध्यानीमनीही का नसावे याचा खेद वाटतो . आणी ' जानुविना करमत नाय .. ' या गाण्याच्या तालावर गणेशास बुडवताना तो मला पुन्हा हे अधःपतन पाहायला बोलवूच नका असे म्हणत असेल . मग कुठे घेऊन चाललात युवापिढीला समाज धुरंधरांनो ? कान्हूर मेसाई सारख्या ग्रामीण भागात किर्तन प्रवचन शिवव्याख्यान आदी प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले . पुणे नगर हायवे लगतच्या प्रगत गावांनी ' आवाज वाढव डीजे ' म्हणत शांताबाई बाबुराव नाचवला . गणेशासमोर गायलो ' देवा तुझ्या दारी आलो गुणगाण गाया ' ऐवजी ' गुण घ्याया ' गायला हवे, व गणेशातील मांगल्य पावित्र्य विद्या ज्ञान बुद्धी हे चांगले गुण घ्यायाला हवेत . पण म्होरके गणेश मंडळाचे अध्यक्ष नेते पदाधिकारीच उत्सव जोरात करण्याच्या नादात तरुणाईला अच्छिल गाण्यांवर नाचवत बरबाद करतेय, याला प्रशासनही जबाबदार आहे . डीजेवर बंदी असताना वशील्यावर परवाने देतातका हेही तपासावे लागेल ? दोन वर्ष कोरोनाने हे अधःपतन टाळले ते बरेच म्हणावे की गणेशोत्सवाचा आनंद घेता आला नाही याचे दुःख बाळगावे हेच कळत नाही . गणपतीसमोर देवाची, गणेशाची भक्ती गिते, भावगिते , अभंग , स्फुर्तीगिते, देशभक्तीगीते, भारूडे , गौळणी , पोवाडे अशी तरुणाईला बळ , वळण, संस्कार देणारी गिते यांच्या चाली सर्वोतम असतात त्या गीतांना वाजवायला हवीत, असे सजग नागरी मंचचे आवाहन आहे . तरच युवापिढी देश वाचेल हे सगळ्यानी विचारात घेऊन भविष्यात आचरणात आणावे , अशी अपेक्षा आहे .