एक जुनी म्हण होती, जो शहाणा असेल त्याने पोलीस स्टेशन व कोर्टाची पायरी चढू नये, पण आजकालची नवीन म्हण सांगतो , शहाणा असेल त्याने वराती पुढे नाचायला ,आर्केस्ट्रापुढे नाचायला बैलगाड्या मागे व पुढार्यांपुढे मागे हिंडू नये .
कारण प्रत्येक गावोगावी आज पंधरा टक्के मुलांची लग्नच होत नाहीत , याचे कारण की ही मुलं डीजेपुढे आर्केस्ट्रापुढे नाचून खायला प्यायला शिकलेली बिघडलेली असतात . बैलगाड्यांच्या नादात वा निवडणुकीच्या वेळी महिनाभर पुढाऱ्यांबरोबर धाब्यावर खाऊन पिऊन बिघडलेली असतात . म्हणून मुलांनी आपलं करिअर घडवण्याऐवजी अशा फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ घालवू नये आणि मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नये अन्यथा त्यांच्या जीवनात रामायण घडतं , हे विचार पत्रकार ह भ प ज्ञानेश्वर मिडगुले यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धामणीमध्ये व्यक्त केले .
प्राचार्य गायकवाड सर व शिक्षकवृंदानी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .एक तासभर मुलांना शिकून सवरूनच मोठे होता येते हे सोदाहरण सांगीतले . निरगुडसर व लोणी ता आंबेगाव येथे ही मिडगुले यांनी हरीपाठ भजन अध्यात्म परमार्थाने मन चित बुद्धी स्थिर एकाग्र पवित्र होवून जिवनात सुखशांती समाधान व परीणामे यश मिळते सांगून २ अभंग पाठ करेल त्या विद्यार्थ्यांना हरीपाठ दिले .