पुणे जिल्हा प्रतिनिधी
दौंड- तालुक्यात महावितरणचा सावळा भोंगळ कारभार नेहमीच पहायला मिळतो कधी लाईट वेळेवर येत नाही तर कधी लाईन दुरुस्ती साठी दिवस दिवस लाईन बंद करण्यात येते मात्र आज दुपारी गिरीम गावात नादुरुस्त असलेल्या लाईन मुळे दोन दुर्मिळ अशा साळिंदर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत..
नुकतेच दौंड तालुक्यातील दापोडी येथे याच हलगर्जीपणा मुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, आणि आत्ता दुर्मिळ प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत नक्की दौंड तालुक्यातील महावितरण यंत्रणा काय साध्य करू पहातेय,दौंड शहरातील व्यापारी, ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक, आणि आता वन्यजीव सुध्दा या त्रासाला कंटाळले आहेत,
अधिकार्यांना कधी जाब विचारायला गेले की अधिकारी शिष्ट पणाचा आव आणत रुबाबात बोलतात बोलण्या पेक्षा काम आणि कामातील सु-सुत्रता सुधारली तर सगळ्याना होणारा त्रास आणि मनस्ताप कमी होईल याकडे महावितरण ने लक्ष देणे गरजेचे आहे.