रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कंरजावणे ता शिरूर येथे कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेतीशाळा उपक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमात हुमणी नियंत्रण साठी प्रकाश सापळा शेतात लावणे, पीक लागवडीच्या वेळी बियाण्याची बीजप्रक्रिया करणे, तसेच गावाला दिलेल्या जमीन सुपीकता निर्देशांक नुसार विविध पिकांना द्यावयाची खतनिहाय मात्रा, लागवडीला बेसल डोसचा वापर करणे, जास्तीत जास्त सेंद्रिय बाबींचा हिरवळीच्या खतांचा अवलंब करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे अशा इत्यादी अनेक कृषी विभाग राबवत असलेल्या मोहीमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन कृषी सहायक संध्या सांडभोर यांनी केले,
कंरजावणे ता शिरूर येथे ऊस पिकावरील शेतकऱ्यांची शेतीशाळा उपक्रम पार पडला कार्यक्रमात शेतीशाळा उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती तज्ञ मार्गदर्शक कृषी सहायक जयवंत भगत यांनी दिली तसेच ऊस लागवडी साठी जमीन निवड पुर्व मशागत पट्टा पध्दत बेणे निवड बेणे प्रक्रिया व बेसल डोस बाबत सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली तसेच रिसोर्स पर्सन सुरेंद्र देव यांनी निसर्गशेती आणि सेंद्रिय शेती याविषयी शेतकऱ्यांना खोलवर मार्गदर्शन करून माहिती देताना कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे मिळेल याची माहिती दिली शेतीशाळा उपक्रमात शासनाच्या कृषी विभागातील विविध योजना बाबत संध्या सांडभोर यांनी माहिती देताना सांगितले कि महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे तसेच नियंत्रित शेती शेडनेट,पॉलीहाऊस,शीतगृह अशा विविध योजनाचा लाभ घ्यावा तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग, नाडेप,गांडूळ युनिट या योजनांचा लाभ घेण्याविषयी मार्गदर्शन केले,
लोकसहभागातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याबाबत हि सांगितले तसेच कार्यक्रमास उपस्थित प्रगतशील शेतकरी जयसिंग पानसरे, दिलीप पुणेकर यांनी त्यांच्या अनुभवातून केलेली सेंद्रिय शेती आणि त्यातून झालेले फायदे याविषयी त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित कृषी मित्र शरद इंगळे यांनी उपस्थित सर्व शेतकरी आणि तज्ञांचे आभार मानले यावेळी बाळकृष्ण दौंडकर,चंद्रकांत दौंडकर, रामदास शिंदे, अरविंद शिंदे, भगवान वाळके,हरिभाऊ कुदळे, लहू तनपुरे,दत्तात्रय साकोरे,रामभाऊ शेलार व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते