रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
यशाची शिखरे पाहताना मागे वळून पाहिले की जीवनात स्थिरता येत असल्याचे प्रतिपादन कालिकामाता विद्यालयाचे माजी शिक्षक भास्कर वाबळे सर यांनी वाघाळे तालुका शिरूर येथे केले. वाघाळे तालुका शिरूर येथील १९९५ साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यास तत्कालीन वर्गशिक्षक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले की , आपण घेतलेला वसा व शिक्षणातून घेतलेले ज्ञान आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजे ज्यामुळे येणाऱ्या पिढी समृद्ध होतील असे ही त्यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी बाळासाहेब शेळके सर , सतिश पाटील सर , मारुती थोरात गुरुजी या गुरुजनांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली . या वेळी उपस्थित सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा शाल , श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तर विद्यालयासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिले.
या वेळी पद्मिनी येवले-हरपुडे , सिमा थोरात-जगताप, निता जगताप -फडके, ललिता शेवाळे-जगदाळे , मंदा गावडे-खामकर , शालन शेळके-थोरात, कविता काळे -भंडारे, वंदना सोनवणे-दरेकर , रेऊबाई थोरात-शिंगाडे , सुरेखा थोरात-बढे , अलका किसन येवले , स्वाती गोविंद जेधे , पुजा गणेश जेधे ,छाया संभाजी गोरडे , संभाजी गोरडे ,संतोष गोरडे, शरद थोरात ,रमेश शेळके ,जयराम कारकुड, शहाजी बढे , नामदेव शिंगाडे, शंकर यशवंत , गणेश भोसले, गणेश जेधे , गोविंद जेधे, किसन येवले, संतोष कारकुड, हरीभाऊ भंडारे , सुहास दरेकर, सुर्यकांत बढे , प्रदीप लोंढे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सिमा थोरात-जगताप , शालन शेळके-थोरात , शहाजी बढे ,शरद थोरात, संभाजी गोरडे ,संतोष गोरडे यांनी केले. सुञसंचलन व आभार संभाजी गोरडे यांनी केले.