सुनील भंडारे पाटील
सणसवाडी तालुका शिरूर येथील पाटील मळा मधील महत्वाचे रोहित्र शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नाने जळालेले रोहित्र दोन दिवसात दिले बदलून,
संबंधित विद्युत रोहित्रावर शेतीक्षेत्राबरोबर पाटील मळ्यामधील रहदारी पिण्याचे पाणी तसेच वापरासाठी लागणारे पाणी अवलंबून असल्याने दोन दिवसापूर्वी रोहित्र जळाल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या,शेतकऱ्यांनी तातडीने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर यांची भेट घेऊन कल्पना दिली, आप्पांनी तातडीने कारवाई करत आमदार पवार यांना सांगितले असता, आमदार अशोक बापू पवार यांनी महावितरण चे वरिष्ठ अधिकारी महाजन, व एडके यांच्याशी संपर्क करून चोवीस तासाच्या आत विद्युत रोहित्र बदलले,
रात्रीच्या काळोखात रोहित्र बदलण्याचे काम आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे,अतिशय कमी वेळात विद्युत रोहित्र बदलल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला, आमदार पवार यांची शेतकऱ्यांच्या बाबतीत आपुलकी, तत्पर कारवाई यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार पवार व त्यांचे खंदे समर्थक सणसवाडी गावचे खंबीर नेतृत्व पुणे जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर यांचे आभार मानले,