सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
आषाढी एकादशी आधीच पंढरपुरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज , ज्ञानोबा - निळोबारायांच्या व इतर शेकडो पालखी सोहळयातील दिंड्या पंढरपुर येथे दाखल झाल्या . काहींच्या धर्मशाळा आहेत तर काहींनी खुल्या मैदानात तंबू राहुट्या ठोकल्या . दोन वर्ष हा पालखी सोहळा कोरोना महामारीमुळे बंद असल्याने या वेळी वारकरी भावीकांचा महापुर लोटला होता .
पण दोन दिवस सतत मुसळधार पावसाने वारकर्यांना भिजवल्यामुळे जास्त बाहेर न पडता आल्याने आपापल्या धर्मशाळा वा राहुट्यांमध्ये भजन किर्तन हरीपाठ प्रवचनादी भक्तीमय वातावरणात वारकर्यांनी आनंद घेतला . वाखरी येथे सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडी एकादशीआधी दोन दिवस पोचलेने चंद्रभागा नदीस्नान व गर्दी असल्याने विठ्ठल मंदिराची परीक्रमा करून वास्तव्याचे ठीकाणी हरीपाठ प्रवचन भजनादी कार्यक्रमांनी पंढरपुरातील आसमंत दणाणून गेले . ज्या त्या राइट्यांतून भजन गायन भारुडादी टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकणाऱ्या वारकर्यांचे बोल सूर ऐकू येत होते . सणसवाडीचे दिंडीत मोठ्या प्रमाणात वारकरी असलेने भजन हरीपाठादी उपक्रम मोठ्या लयबद्धरित्या झाले . महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता . या दिंडीचे वैशीष्ठ्य म्हणजे जेवन व पाणी व्यवस्था इतकी उतमरित्या पदाधीकार्यांनी केली होती ' चारसेपैकी एकही वारकरी आजारी पडला नाही . इतर दिंड्यानी बरेच वाटकरी आजारी पडल्याने वा तपासणीत पॉझीटीव्ह आढळल्याने शेकडो पेशंटना दिंडी चालकांनी शेकडो वारकरी मागे पाठविले . तरी आठवड्यांपासून लोक कोरोना भयाने गर्दी आधीच येवून गेले . भर पावसातही वारकरी फुगडी फेरा आदी प्रकारे आनंद घेत होते . गर्दी नियंत्रित करणेसाठीच देवाने सततधार बरसवली असा विचार काही वारकर्यांनी बोलून दावले,
पण दोन दिवस सतत मुसळधार पावसाने वारकर्यांना भिजवल्यामुळे जास्त बाहेर न पडता आल्याने आपापल्या धर्मशाळा वा राहुट्यांमध्ये भजन किर्तन हरीपाठ प्रवचनादी भक्तीमय वातावरणात वारकर्यांनी आनंद घेतला . वाखरी येथे सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडी एकादशीआधी दोन दिवस पोचलेने चंद्रभागा नदीस्नान व गर्दी असल्याने विठ्ठल मंदिराची परीक्रमा करून वास्तव्याचे ठीकाणी हरीपाठ प्रवचन भजनादी कार्यक्रमांनी पंढरपुरातील आसमंत दणाणून गेले . ज्या त्या राइट्यांतून भजन गायन भारुडादी टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकणाऱ्या वारकर्यांचे बोल सूर ऐकू येत होते . सणसवाडीचे दिंडीत मोठ्या प्रमाणात वारकरी असलेने भजन हरीपाठादी उपक्रम मोठ्या लयबद्धरित्या झाले . महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता . या दिंडीचे वैशीष्ठ्य म्हणजे जेवन व पाणी व्यवस्था इतकी उतमरित्या पदाधीकार्यांनी केली होती ' चारसेपैकी एकही वारकरी आजारी पडला नाही . इतर दिंड्यानी बरेच वाटकरी आजारी पडल्याने वा तपासणीत पॉझीटीव्ह आढळल्याने शेकडो पेशंटना दिंडी चालकांनी शेकडो वारकरी मागे पाठविले . तरी आठवड्यांपासून लोक कोरोना भयाने गर्दी आधीच येवून गेले . भर पावसातही वारकरी फुगडी फेरा आदी प्रकारे आनंद घेत होते . गर्दी नियंत्रित करणेसाठीच देवाने सततधार बरसवली असा विचार काही वारकर्यांनी बोलून दावले,