लोणी काळभोर अनिकेत मुळीक
एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडी सरकार पाडलं. ते स्वत: राज्याचे मुख्यमंत्री झाले. अन् आता त्यांचं पुर्ण लक्ष शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सातत्यानं धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे असा दावा वारंवार करताना दिसत आहेत. त्यामुळे सत्तेसोबतच आता धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पण या प्रकरणामुळे शिवसैनिक मात्र गोंधळात पडले आहेत. अन् त्यांचा हा संभ्रम सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिवसैनिक मातोश्रीवर जाणार की ठाण्याला? असे टोले विरोधक त्यांना लगावत आहेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि 'धनुष्यबाण' हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला 'धनुष्यबाण' हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झाली आहे का, असा प्रश्न आता या ट्विटमुळे निर्माण झाला आहे.
पण या प्रकरणामुळे शिवसैनिक मात्र गोंधळात पडले आहेत. अन् त्यांचा हा संभ्रम सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिवसैनिक मातोश्रीवर जाणार की ठाण्याला? असे टोले विरोधक त्यांना लगावत आहेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि 'धनुष्यबाण' हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला 'धनुष्यबाण' हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झाली आहे का, असा प्रश्न आता या ट्विटमुळे निर्माण झाला आहे.