सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले
पुणे जिल्ह्यातील उंचवट्यावर वसलेले दुष्काळग्रस्त गाव मिडगुलवाडी हे वर्षातून ६ महिने पिण्याचे पाण्यासाठी शासकीय टँकरवर अवलंबून होते,
पण माजी सरपंच सुनिल मिडगुले , हरीभाऊ मिडगुले , कैलास मिडगुले, महादू गाजरे , महादू तांबे,उपसरपंच इचके , माजी उपसरपंच शरद पोकळे, मुकुंद मिडगुले, सरपंच वर्षा धनंजय मिडगुले , निता कोळेकर , बाळासाहेब मिडगुले, हिरामण मिडगुले , हभप पोपट महाराज मिडगुले ; काळूराम गाजरे व सर्वच ग्रामस्थांच्या भगरथ प्रयत्नातून मिडगुलवाडीचे पिण्याच्या पाण्याचे हाल संपले .
भारत सरकारच्या जलजिवण मिशन हर घर जल योजना अंतर्गत १ कोटी ३७लाख व गावाने डिंभे कालव्याशेजारी विहीर घेवून स्वतंत्र डीपी बसवून आज पाणी सोडण्यात आले . ते पाणी कलशात भरून ग्रामस्थांनी वाजंत्री लावून मिरवणुक काढली . विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर महिलांनी फुगड्यांचा फेर धरून आनंद व्यक्त केला . गंगेची आरती घेवून पाणी पूजन करणेत आले . २ किलोमिटरहून दुडीवर दुडी नंतर सायकलवर कॅनने पाणी आणण्याचा महिला व मुलांचा काच संपल्याने वाडवडीलांची पुण्याई व ग्रामस्थांचे यशस्वी प्रयत्न फळा आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. फियाट कंपनीच्या कृपाशिर्वादाने व भोसरीचे आमदार महेश लांडे व दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्याने मिडगुलवाडी आदर्शग्राम म्हणून नावारूपास येत असता पिण्याचे पाण्याचा खरा महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरीकांकडून सरपंच व प्रयत्न कर्त्यांचे मनोमन आभार व्यक्त करणेत येत आहेत .