सुनील भंडारे पाटील
पुणे-नगर महामार्गावर अनेक ठिकाणच्या चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले असून झेब्रा क्रॉसिंग निकृष्ट दर्जाचे आहे, तसेच आवश्यक जागा सोडून चुकीच्या पद्धतीने झेब्रा क्रॉसिंग केल्याने मिळत आहे अपघाताला नियंत्रण संबंधित खात्याचे दुर्लक्ष,
संबंधित महामार्गावर नूतनीकरणानंतर वाहनांचा वेग खूप वाढलेला आहे, महामार्गा लगत चंदन नगर पासून शिरूर पर्यंत अनेक गावे बसलेली आहे तसेच जोडलेली आहेत, दाट रहदारीमुळे, तसेच इतर औद्योगिक, शेतमाल वाहतुकीमुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे, बेशिस्त वाहन चालकांमुळे महामार्ग लगतची गावे तसेच रस्ता ओलांडणारे पादचारी यांचा वाहन चालकांकडून अजिबात विचार केला जात नाही, बेशिस्त वाहन चालक आणि वाहनांचा वेग यामुळे दिवसाढवळ्या रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाताच्या खाईत लोटले जाते,
चौकाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग हवेत,परंतु चौक सोडून अनेक आंतर मागे झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहेत, वास्तविक पाहता या झेब्रा क्रॉसिंग मुळे वाहन वेग कमी होत नाही, शिवाय पादचाऱ्यांना पण त्याचा उपयोग होत नाही, आहे त्या वेगात वाहने सुसाट धावतात, शिवाय आपल्याला छायाचित्रांमध्ये दिसत आहे झेब्रा क्रॉसिंगच्या समोरच सूचना फलक चुकीच्या पद्धतीने लावला आहे, हा सूचनाफलक झेब्रा क्रॉसिंग च्या अगोदर काही अंतर पाहिजे त्यामुळे वाहन चालकांना सूचना मिळते, अशा काही अडचणींमुळे पुणे नगर महामार्गावर अपघाताला निमंत्रण मिळत आहे,