मुंबईत ३ अतिरेकी घुसल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन - यंत्रणा अलर्ट

Bharari News
0
मुंबई प्रतिनिधी अनिल केळकर 
          मुंबईत ३ दहशतवादी घुसले आहेत, असा  फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव, मोबाईल नंबर व गाडीचा क्रमांकही दिला आहे.   
 फोन करणाऱ्यांने आपले नावसुद्धा सांगितले आहे. दुबईवरून शुक्रवारी ७ एप्रिल पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचे फोन करणाऱ्याने दावा केला आहे. आता हा फोन आहे की खोटा? याच्या तपासाला मुंबई पोलीस लागले आहेत. अनेकदा फेक काॅल नियंत्रण कशाला केले जातात... तसाच हा काहीसा प्रकार तर नाही ना? हे तपासून पाहिले जात आहे.
          पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस कक्षाला फोन आला. दुबईवरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा राजा ठोंगे, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने केला. या कॉल नंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्या व्यक्तीने त्या तीन जणांपैकी एकाचे नाव मुजीब सैय्यद असून, त्याचा मोबाईल क्रमांक आणि गाडीचा क्रमांक देखील पोलिसांना संबंधित काॅलरकडून देण्यात आलाआहे, तसेच या तीनही व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचा दावाही कॉलरने केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या संबंधी चौकशी करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!