यावर्षी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात २० लाखांवर वारकऱ्यांनी विठुरायांच्या दरबारात हजेरी लावली . चंद्रभागेमध्ये स्नान करता अवघे दोष हरण होतात असे म्हटले जाते, पालखी रथाचे मानाचे बैल व दिंडीपुढे चालणाऱ्या वारकऱ्यांआधी प्रथम या हजारो बैलांना व घोड्यांना अगदी घासून चोळून स्नान घातले .
महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या कालच पंढरपुरात पोचता प्रथम रथासह इंद्रायणीच्या वाळवंटी उतरून प्रथम स्नान संध्या पादुकास्नान पुजा आरती करून मगच आपापल्या धर्मशाळा वा मुक्कामाच्या ठीकाणी जातात . अलंकापुरीतून , देहूतून तुकोबारायांची, त्र्यंबकेश्वरहून निवृतीनाथांची , पैठणहून एकनाथ महाराजाची , l सासवडहून सोपानदेवांची, मुक्ताईनगरवरून मुक्ताईची पिंपळनेरहुन निळोबारायांची, शेगावहून गजानन महाराजांची श्रीक्षेत्र नारायणगडहून नारायण महाराजाची वअशा हजारो गावांतून हजारो दिंड्या 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या नामघोषात पंढरपुर नगरीत दाखल झाल्या व दिवस प्रत्येक धर्मशाळा तंबू राहुट्यांनी टाळमृदुंगाचे निनादात किर्तन प्रवचन भजन भारुड हरीपाठ काकडादी कार्यक्रमांनी आसमंत दणाणून सोडले आहे.
यावर्षी पाऊस नाही म्हणून भावीकांची संख्या रोडावेल असे वाटत होते पण उलटे झाले , चला पेरणीच नाही तर काही कामच नाही म्हणून शेतकरी कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात आल्याने 20 लाखांवर समाज लोटला, काय पण १० हजारांवर परदेशी पर्यटक कुतुहलाने जगात सर्वोतम असा सोहळा पहाण्यास हजेरी लावतात हे विशेष! या वारीत जगाला समता व संस्काराचा संदेश जातो. 20 दिवस वारकरी चालून पांडूरंगाचे मंदिराचे कळसाचे दर्शन घेवून धन्य होत सुखावतो त्याला ईथून वर्षभर कष्ट करण्यासाठीची उर्जा मिळते व उद्या बारस सोडून सारे 'जातो माघारी पंढरीनाथा 'म्हणत परतीच्या प्रवासाला लागतील उन वारा वादळ पाऊस हालअपेष्टा सोसत सुख समाधान प्राप्तीची ही वारी म्हणजे प्रपंच व परमार्थाची योग्य सांगड असून आत्मशुद्धीचा साधा सोपा सरळ ठेकमार आहे.