विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच अध्यात्मिक शिक्षण घेणे गरजेचे:मारुती भूमकर....
-[लोणीकंद येथे न्यु टाईम्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा उत्साहात ]-
संताच्या विचारांचे जतन व्हावे व बालवयातच विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मानवी जीवनातील संतांच्या योगदानाचा उलगडा करीत विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांचा शिक्षणात इतर शिक्षणाबरोबर अध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास असणे गरजेचे आहे.सदस्यस्थितीत विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच अध्यात्मिक शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भूमकर यांनी केले.
नऊवारी साडीसह पारंपारिक वेषभूषा केलेल्या विद्यार्थिनी,कुर्ता पायजमा घाललेले विद्यार्थी,हातात डौलदार भगवे ध्वज,लेझीमच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात चाललेली भव्यदिव्य पालखी मिरवणूक आणि मुखात विठूरायांचा जयघोष.हे चित्र होते लोणीकंद येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूल आयोजित भव्य पालखी सोहळ्यात दिसून आले.
लोणीकंद गावातील म्हसोबा मंदिरापासून सुरूवात होऊन गावाला वळसा घालून हनुमान मंदीर येथे दिंडीचा समारोप झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांनी आणि विठूमाऊलीच्या जयघोषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संस्थापक मारूती भुमकर,विद्यालयाच्या प्राचार्या रीतिका नायडू यांच्या नेतृत्वाखाली बालदिंडीचा कार्यक्रम पार पडला.दीपप्रज्वलन विविध संताच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी मुलींची लेझीम व नृत्याचे सादरीकरण झाले.इयत्ता बारावीतील मयुरी कोतांबे हीने उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करीत तसेच इ.दुसरीतील कु.राजवीर याने भजन गायन करून उपस्थित वातावरण भक्तीमय केले.
दरम्यान कार्यक्रमासाठी सोसायटीचे सदस्य पांडुरंग दत्तात्रय भूमकर,श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दिलीप दंगेकर,तसेच लोणीकंदचे माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे,हभप रवि कंद,गुलाबराव शिंदे,निवृत्त पी.एस.आय. ज्ञानेश्वर झुरुंगे,शिवाजीराव वाळुंज, ग्रामस्थ,पालकवर्ग व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका पौर्णिमा मॅडम यांनी केले.