हवेली प्रतिनिधी
निमगाव म्हाळुंगी ( ता शिरूर ) ग्रामपंचायतच्या सविता विजय करपे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. श्री म्हसोबा ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख शिरूर तालुका पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग, निमगाव म्हाळुंगी चे मा. सरपंच तथा मनसे शिरूर तालुका अध्यक्ष तेजस यादव,भारत सरकार नोटरी ॲड. रावसाहेब करपे, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे,माजी सरपंच रावसाहेब चव्हाण, भरत विधाटे, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण,मेजर महेंद्र चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब बबनराव काळे यांनी सरपंच पदाचा अर्ज दाखल केला होता.
सरपंच पदासाठी बापूसाहेब काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी बापूसाहेब काळे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
त्यावेळी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सविता विजय करपे,उपसरपंच अश्विनी एकनाथ लांडगे,माजी उपसरपंच तनुजा विधाटे, कविता चौधरी, कविता रणसिंग, ग्रामपंचायत सदस्या ज्योती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सचिन चव्हाण, प्रदीप पवार,ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, निमगाव म्हाळुंगी गाव कामगार तलाठी शांताराम सातपुते, निमगाव म्हाळुंगी पोलीस पाटील किरण काळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष करपे आदी वरिल पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये सदर निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला.
सदर निवडणूकीच्या निमित्ताने उपस्थिती राहून शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद च्या आदर्श सदस्या रेखाताई बांदल, पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग,भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्च्या चे प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे, भाजपा युवा मोर्च्या प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ,मन कि बात पुणे जिल्हा सहसंयोजक शरद रासकर, यांनी आपल्या मनोगतातून बापूसाहेब काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर निवडणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी बापूसाहेब काळे यांनी माझ्या आयुष्यात अनेक काम करण्याचा योग मला मिळाला त्यामध्ये बिगारी काम, हेल्पर, अशा प्रकारची कामं करत असताना पुण्यामध्ये वडापाव आणि चहा च्या हातगाडी वर काम करण्याची संधी मिळाली .सदर वेळी पुण्यामध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने सुरवातीला काही वर्षे फुटपाथवर राहावा लागले आणि त्यातच शिवाजीनगर चे तत्कालीन नगरसेवक गोरक्षक आदरणीय मिलिंदभाऊ एकबोटे यांच्याशी माझा परिचय झाला आणि माझं आयुष्य बदलून गेले.त्या नंतर माझे मार्गदर्शक प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.गजानन एकबोटे सरांचा सानिद्यात जाण्याचा योग माझ्या भाग्यात आला आणि त्या नंतर माझ्या आयुष्याच्या जडण घडणीला सुरवात झाली.
माझ्या आयुष्यात आदरणीय डॉ गजानन एकबोटे सरांमुळे मला शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि त्यातून माझे शिक्षण एम.कॉम बी. एड पर्यंत पूर्ण केले. शिक्षण घेत असताना ज्यांनी मला खूप मोठा आशीर्वाद दिला त्या म्हणजे आदरणीय डॉ. गजानन एकबोटे, आदरणीय मिलिंदभाऊ एकबोटे आणि आदरणीय नंदकुमार एकबोटे यांच्या आई आणि आमच्या आक्का स्व.सुशीला एकबोटे यांनी माझ्यावर आपल्या नातवांप्रमाणे आजीचे प्रेम दिले आणि आमच्या वहिनी म्हणजेच विद्यमान भाजपा च्या आदर्श नगरसेविका जोस्त्ना एकबोटे यांनी मला आपल्या मुलांप्रमाणे खूप जीव लावला.
यामुळे आमच्या मध्ये खूप जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यातच माझा एकबोटे कुटुंबियांशी आणि त्यांच्या विचारांशी जोडण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला यश मिळत गेले. माझ्या आई वडिलांनंतर माझे सर्वस्व म्हणजेच माझे एकबोटे कुटुंब होय. या कुटुंबाला माझे संपूर्ण श्रेय जाते.तेंव्हा पासून सामाजिक कार्यातील गुरु म्हणून आदरणीय मिलिंद एकबोटे आणि राजकीय गुरु म्हणून आदरणीय डॉ. गजानन एकबोटे सर यां दोघांनाही मी माझे गुरु मानले. या दोघांकडून खूप काही शिकलो.तसेच बहिणीच्या आणि भावाच्या रूपांन मला डॉ. निवेदिता एकबोटे, डॉ.गायत्री एकबोटे आणि डॉ.दिग्विजय एकबोटे डॉ. वैष्णवी एकबोटे, डॉ. ऋग्वेदी एकबोटे यांच्या सोबत मला लहानपणा पासून तर आत्तापर्यंत मला बहीण भाऊ मिळाले हेपण खूप मोठ माझं भाग्य आहे असं मी म्हणेल.तसेच मला विविध सामाजिक संघटना मध्ये काम करण्याचा योग आला मग त्यामध्ये सुरवातीला प्रतापगड उत्सव समिती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ,समस्त हिंदू आघाडी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठाण, पुणे जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशन आणि शिवराज्य प्रतिष्ठाण यां सारख्या संघटना मधून मला सामाजिक कार्य करण्याच भाग्य मिळालं. तसेच देशातील एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष असणारा आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या विचारांवर काम करणारा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मला शिरूर तालुका भाजपा युवा मोर्च्या उपाध्यक्ष त्यानंतर शिरूर तालुका मन की बात संयोजक काम करण्याची संधी मला आमचे मार्गदर्शक ऍड धर्मेंद्र खांडरे, वाजेवाडीचे उपसरपंच अमित सोनावणे, दादापाटील फराटे, आणि विद्यमान शिरूर तालुका आबासाहेब सोनावणे, रोहित खैरे यांच्या मुळे मला मिळाली आणि उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वा खाली मी उत्तर पुणे जिल्हा मन की बात संयोजक म्हणून जबाबदारी उत्कृष्ट रीत्या सांभाळत आहे याचा निश्चित आनंद मला होतोय.सदर कार्यक्रम प्रसंगी त्यांची आई पमाबाई काळे, पत्नी सुनीता काळे मुले रोशनी काळे आणि कुणाल काळे यांच्या समवेत त्यांचे काळे कुटुंबीय आणि काळे कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वच ग्रामस्थ यांना आनंदाअश्रू अनावर झाले,
मला माझ्या वॉर्ड क्र.1 मधील सोरटाय मळा, गुंजरढवरा, तावरे वस्ती आणि काळे वस्ती या सर्वानी मिळून मला बिनविरोध निवडून दिले आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील एक उच्चशिक्षित युवकाला सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा बिनविरोध निवडून दिले तसेच विविध सामाजिक कामं करत असताना मला माझ्या आयुष्याच्या सुरवातीपासून तर आत्तापर्यंत जो माझा मित्र परिवार,माझा हितचिंतक आहेत ज्यांच्या मुळे मी आज गावचा सरपंच आणि जिल्ह्यातील पदाधिकारी झालो त्या सर्व मित्र परिवाराचे आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला खंबीर साथ देऊन मला बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य केल त्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
सदर वेळी सरपंच बापूसाहेब काळे यांच्या आई पमाबाई काळे,मा. ग्रामपंचायत सदस्य डॉ. रमेश चौधरी, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी बाजीराव चौधरी,नामदेव काळे, शिवाजी चौधरी, बाळू चौधरी,उद्योजक श्री विजय बापू करपे,माजी सैनिक अंकुश काळे,काकासाहेब करपे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे, नामदेव भोरडे, उमेश चौधरी,वामनराव गव्हाणे,अजित चौधरी, विजय विधाटे,राहुल रणसिंग,अविनाश रणसिंग,अजित विधाटे,खंडू काळे,विलास रणसिंग,संपत चव्हाण,नितीन चौधरी,ग्रामपंचायत कर्मचारी अपेक्षा टाकळकर,वसंत भागवत, प्रदीप करपे, विठाबाई पवार आदी कर्मचारी व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.