मोठी बातमी -२० फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास मराठा आरक्षण संघर्ष योद्धा यांचा सरकारला इशारा

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
              मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ९ व्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. २० तारखेपर्यंत सगेसोयरेंची अंमल बजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसं केलं नाही तर आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 
                  २० फेब्रुवारीला विधान सभेच विशेष अधिवेशन होनार आहे. यात मराठा आरक्षणा बाबत चर्चा होणार आहे. मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण मिळावं. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे म्हणून आरक्षण दयाव असी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. सरकारने तसी अधि सूचना काढून कायद्याने आरक्षण देऊ असे कबूल केलेल होते. परंतु २० फेब्रुवारीला अधिवेशनात याची अंमल बजावणी होते की नाही ते पाहणार आहे.
              जर अंमल बजावणी नाही झाली तर अधिवेशना च्या वेळेनुसार आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. म्हणजे अधिवेशन लवकर संपलं तर २० तारखेला च उशिरा संपल तर २१ तारखेला आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले आहेत.
                राज्य सरकारने २ महिन्यांचा वेळ मागितला होता. २४ डिसेंबरला च हा कालावधी संपला होता. चार महिन्यां पासून प्रक्रिया सुरू होती. आरक्षण द्यायचं होते म्हणूनच अधिसूचना काढली. बहु मताने हा कायदा करा मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. ते १०० टक्के याची अंमलबजावणी करतील. असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आरक्षण मिळाल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही. २१ फेब्रुवारीला शेवट ची पत्रकार परिषद घेण्यात येईल त्यात मध्ये पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!