उरुळी कांचन येथील वाहतुक नियोजनात उरुळी कांचनचे पोलीस सपशेल नापास

Bharari News
0
उरुळी कांचन येथील वाहतुक नियोजनात उरुळी कांचनचे पोलीस सपशेल नापास

पुणे सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी नित्याची  
उरुळी कांचन प्रतिनिधी नितीन करडे
          पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. सुट्टीचा दिवस असो किंवा इतर दिवस उरुळी कांचन येथे वाहतुक कोंडी नित्याचीच बाब होत आहे. आज सकाळ पासुनच उरुळी कांचन येथील बस स्टॉप चौक व शिंदवणे चौक येथे सकाळ पासुनच वाहतूक कोंडी झाली होती. होणाऱ्या वाहतूक कोंडीतून शाळेचे विद्यार्थी वृद्ध नागरिक यांना पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना अनेक आडचणींना सामोरे जावा लागत असुन मोठी कसरत करावी लागत आहे. त्या ठिकाणी पोलीस नेमणे गरजेचे आहे. पोलीस माञ वाहतुक कोंडी झाल्यावरच त्या ठिकाणी तेवढ्यापुरते दिसतात.असे विजय कानकाटे यांनी सांगितले.
उरुळी कांचनच्या पोलीसांचे वाहतुक कोंडी सोडण्याचे नियोजन नसल्याने सतत वाहतुक कोंडी होत आहे, शिंदवणे चौकात पोलीस कर्मचारी असून त्या ठिकाणी वाहतुक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा जीव टांगणीला, वाहतूक कोंडी सोडवण्यास पोलीस सपशेल नापास
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!