सुनील भंडारे पाटील
शिवस्मारक राजभवनावर झालेच पाहिजे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ऍड मनोज दादा आखरे व महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी पुणे येथील मेळाव्यात शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावं अशी घोषणा केली आहे,
त्या मागणीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे, आज पुणे जिल्ह्याच्या वतीने स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात करण्यात आली, यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, मावळ लोकसभा अध्यक्ष दिनकर केदारी, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, संघटक अंकुश हाके, संतोष सुर्यवंशी, आदम तांबोळी,चैतन्य कुवर उपस्थित होते,