शिक्षणा सोबत संस्कार महत्त्वाचे आहेत प.पू.राम गोविंद प्रभुजी

Bharari News
0
शिक्षणा सोबत संस्कार महत्त्वाचे आहेत प.पू.राम गोविंद प्रभुजी 
हिंदु हेल्प लाईनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी प्रतिनिधी 
            निपाणी येथे दि प्लस हॉल मध्ये निपाणी आणि निपाणी तालुक्यातील 60हून अधिक दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांनां परीक्षा मध्ये जास्त गुण मिळवलेला असा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इस्कॉनचे पुणे (निगडी) येथील प.पू.राम गोविंद प्रभुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी,प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा व निपाणी सर्कल चे C.P.I B.S.तळवार यांच्या हास्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह,भगवद्गीता देवून आशीर्वादरुपी सत्कार करण्यात आला.

 सर्व प्रथम विद्येची देवता सरस्वती देवीचे फोटो पूजन सर्व करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली निपाणी चे C.P.I B.S.तळवार सर यांनी मनोगत व्यक्त करते वेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबत मैदानी खेळाकडे ही लक्ष दिले पाहिजे ,

बुद्धी सोबत मन आणि मनगट ही बलशाली झाले पाहिजे शिक्षणा मध्ये उतुंग यश प्राप्त झाल्या वर आपली समाज आणि राष्ट्र या विषयी मोठी जबाबदारी वाढते आपल्या प्रगती सोबत समाज आणि राष्ट्राची प्रगती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच तरुणांनी व्यसन, वाईट गोष्टी पासून दूर राहून राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे असे आव्हान यावेळी C.P.I तळवार सर यांनी केले.

यावेळी प.पू.राम गोविंद प्रभुजी यांनी प्रमुख मार्गदर्शन देते वेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण अवस्थेत फक्त ज्ञानग्रहण करावे. यावेळी टीव्ही मोबाईल यापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा व सोशल मीडिया वर आवश्यक तेवढेच सहभागी राहवावे. या वयात आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. 

 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती आपले भारतीय विचार आपल्या आचार तसेच संत महंत क्रांतिकारक यांच्या चरित्र आणून देऊन त्यांच्याकडून ते वाचून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला शिकवावे असे मार्गदर्शन करतेवेळी प.पू.राम गोविंद प्रभुजी यांनी मत व्यक्त केले. यावेळी प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमाचे कौतुक केले असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले पाहिजे तसेच शिक्षण घेते वेळी कोणत्याही विद्यार्थ्यांना कसली ही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपने सर्व साधुसंत महंत उभे राहतील असा संदेश प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी दिला.

 प. पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा बोलते वेळी सांगितले की विद्यार्थ्यांनी नेहमीच आशावादी रहावे व पालकांनी मुलांना कडून जबरदस्ती ची अपेक्षा करू नये पालकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकां सोबत व त्याचा मित्रा सोबत नेहमीच संपर्कात राहिले पाहिजे व विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत अध्यात्माची ही महत्व समजावून सांगितले पाहिजे असे मत प. पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी व्यक्त केले हिंदू हेल्प लाईन चे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की निपाणी मधील साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हेल्प लाईन च्या वतीने मागील वर्षा पासून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन पास झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा साधू संत महंत यांच्या हस्ते आशीर्वाद रुपी सत्कार करून गौरवण्यात आले आहे यावेळी हिंदू हेल्प लाईन च्या वतीने निपाणी आणी निपाणी परिसरात विविध उपक्रम राबवले जात असताता असे सांगितले यावेळी अँड. बेंद्रे मॅडम सुचित्रा ताई कुलकर्णी 

  यांनी ही गुणवंत विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरद सर तर आभार सुनील जनवाडे यांनी मानले..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्कॉन सह सदगुरू सच्चिदानंद महाराज सेवा कमेटी, यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमा मध्ये सधर्म चारिटेबल ट्रस्ट सेवा,हिंदू हेल्प लाईन निपाणी, गोरक्षण सेवा समिती निपाणी व सकल हिंदू समाज निपाणी यांचे कार्यकर्ते भक्त मंडळी,विद्यार्थी व पालक
 मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!