शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी
हाजी गावचे उपसरपंच पैलवान तुकाराम ऊचाळे यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त
तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी रायगड किल्ला येथे
वृक्षारोपण कार्यक्रम केला.यावेळी उपसरपंच पैलवान तुकाराम ऊचाळे,कोहिनूर
उद्योग समूहाचे चेअरमन पैलवान स्वप्निल गावडे, शिरापुर गावचे लखन ऊचाळे,
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विजय थोरात,शिरूर
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्रीकांत काणे,सामाजिक
कार्यकर्ता विकास गावडे,ज्ञानेश्र्वर गावडे,पवन गावडे व रायगड जिल्ह्यातील
मृत्युंजय ग्रुपमधील सदस्य उपस्थित होते. डोंगरगण या गावी जन्मलेले परंतु कर्मभूमी म्हणून टाकळी हाजी गावात अनेक
मित्र परिवाराशी संपर्क असून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होऊन
समाजकारण करत असताना टाकळी हाजी येथील मागील पंचवार्षिक ग्रुप ग्रामपंचायत
निवडणुकीत मित्र परिवाराच्या आग्रहातर निवडणूक लढून सदस्यपदी विजयी
झाले,पुढील काही वर्षात त्यांची सामाजिक बांधिलकी पाहून खास मैत्रीखातीर
तत्कालीन उपसरपंच अजित सोनभाऊ गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन
उपसरपंच पदाची माळ पैलवान तुकाराम ऊचाळे यांच्या गळ्यात घातली. तेव्हापासून
ते आजतागायत गेले अनेक वर्ष पैलवान तुकाराम ऊचाळे यांनी टाकळी हाजी गावचे
उपसरपंच पद भूषवत असताना शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या
मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.यामध्ये मृत्युंजय ग्रुप
मार्फत मोफत कराटे क्लासेस,क्रिकेट स्पर्धा,कुस्ती स्पर्धा,मोफत पोलिस
भरती पूर्व प्रशिक्षण,मोफत सामुदायिक विवाह सोहळा,मृत्युंजय फिटनेस
क्लब,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविले आहे. गावातील
नागरिकांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्याचे काम ते करत आहे.यावेळी
त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की,४०व्या वाढदिवसानिमित्त ४०
जणांचे शरीर अवयवदानाचा संकल्प केला आहे, या संकल्पनेचे तालुक्यातून
त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी आमदार पोपटराव गावडे,घोडगंगा
सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांचे कट्टर समर्थक म्हणून
त्यांची ओळख या परिसरात आहे.त्यांचा असलेला टाकळी हाजी परिसरात दांडगा
संपर्कामुळे येणाऱ्या पंचायत समिती शिरूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाकडून टाकळी हाजी गणातून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे,अशी
माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.