दामू आण्णा यांना मिळालेला आदर्श पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेला न्याय ... सुभाष आण्णा उमाप ..माजी सभापती पंचायत समिती शिरूर
शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील माजी सरपंच दामुशेठ धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संगमनेर येथे एकवीरा फाऊंडेशन च्या संस्थापिका जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व दिपकृष्ण ग्रामीण सहकारी बँकेचे चेअरमन समाजश्री दिपक दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
आपल्या वडिलांचे आजाराने निधन झाल्यानंतर गावाच्या हितासाठी स्वतः ॲम्बुलन्स उपलब्ध करून देऊन प्रत्येक रुग्णाच्या मदतीला धावून जाऊन प्रसंगी त्या रुग्णाचा खर्चही स्वतः केलेला आहे.भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेतून घरे मंजूर करताना लागणारे कागदपत्रे जमा करण्यापासून त्या लोकांना घराची पूजा करणेपर्यंत सर्व काम जबाबदारीने घेवून जी रक्कम कमी पडली ती स्वतः च्या खिशातून टाकून नवीन जीवनशैली उपलब्ध केल्यामुळे समाजातील लोकांमध्ये जागृती झाली असून तिथे जवळच असणाऱ्या शाळेत त्यांची मुले शिक्षण घेवू लागली आहेत .तसेच त्यांना जातीचे दाखले स्वतः प्रयत्न करून मिळवून दिले आहेत.
गोरगरीब जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता, सर्वसमावेशक, सर्वांच्या सुख-दुःखात अग्रभागी राहून समाजहित जपत असताना स्वतःच्या खिशाला झळ घेऊन गरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा एक दानशूर नेता अशी ओळख असताना त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे त्यांच्या पुढील कार्यास नक्कीच चालना मिळत राहिल.
गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असून या पुरस्कारामुळे माझी समाजाप्रती कामाची जबाबदारी वाढली आहे.
........ दामुशेठ घोडे .. आदर्श सरपंच,टाकळी हाजी