दामू आण्णा यांना मिळालेला आदर्श पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेला न्याय ... सुभाष आण्णा उमाप ..माजी सभापती पंचायत समिती शिरूर

Bharari News
0

दामू आण्णा यांना मिळालेला आदर्श पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेला न्याय ...  सुभाष आण्णा उमाप ..माजी सभापती पंचायत समिती शिरूर

शिरूर विशेष प्रतिनिधी 

            शिरूर  तालुक्यातील  टाकळी हाजी येथील माजी सरपंच दामुशेठ धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले होते.              

संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत  सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा,सांस्कृतिक, उद्योग,व्यवसाय अशा क्षेत्रामधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील गुनिजन व्यक्तींचा अभ्यास करून राज्यस्तरीय शिवछत्रपती संजीवनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संगमनेर येथे एकवीरा फाऊंडेशन च्या संस्थापिका  जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व दिपकृष्ण ग्रामीण सहकारी बँकेचे चेअरमन समाजश्री दिपक दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.       

दामुशेठ घोडे यांनी दहा वर्षे तर त्यांची पत्नी अरुणाताई यांनी पाच वर्षे  असे सलग पंधरा वर्षे याच उभयंता ने टाकळी हाजी चे सरपंच पद भुषविताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या प्रश्र्नाबरोबर गावच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.

        आपल्या वडिलांचे आजाराने निधन झाल्यानंतर गावाच्या हितासाठी स्वतः ॲम्बुलन्स उपलब्ध करून देऊन प्रत्येक रुग्णाच्या मदतीला धावून जाऊन प्रसंगी त्या रुग्णाचा खर्चही स्वतः केलेला आहे.भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेतून घरे मंजूर करताना लागणारे कागदपत्रे जमा करण्यापासून त्या लोकांना घराची पूजा करणेपर्यंत सर्व काम जबाबदारीने घेवून जी रक्कम कमी पडली ती स्वतः च्या खिशातून टाकून नवीन जीवनशैली उपलब्ध केल्यामुळे समाजातील लोकांमध्ये जागृती झाली असून तिथे जवळच असणाऱ्या शाळेत त्यांची मुले शिक्षण घेवू लागली आहेत .तसेच त्यांना जातीचे दाखले स्वतः प्रयत्न करून मिळवून दिले आहेत.

       गोरगरीब जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता, सर्वसमावेशक, सर्वांच्या सुख-दुःखात अग्रभागी राहून समाजहित जपत असताना स्वतःच्या खिशाला झळ घेऊन गरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा एक दानशूर नेता अशी ओळख असताना त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे त्यांच्या पुढील कार्यास नक्कीच चालना मिळत राहिल.
गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी  सदैव कटिबद्ध असून या पुरस्कारामुळे माझी समाजाप्रती कामाची जबाबदारी वाढली आहे.
 ........  दामुशेठ घोडे .. आदर्श सरपंच,टाकळी हाजी

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!