ह भ प मिडगुले यांचे पालखी सोहळ्यात प्रवचन

Bharari News
0

 सुनील भंडारे पाटील

       एरव्ही अपवित्र म्हणून कातडी वस्तुंना मंदिरात मनाई असते, पण कातड्याची पाने पखवाजास असताना पखवाज्यास मात्र मानाने बोलवतात , असा विरोधाभास फक्त अध्यात्मात चालतो, असे मत इंदापुर येथे निळोबारायाच्या पालखी सोहळ्यात सरडे लॉन्स येथे उपस्थीत वारकरी भाविकांसमोर मांडले . तुकाराम महाराजाचे अभंगावर बोलताना त्यांनी जिवन सफल होण्यासाठी परमार्था शिवाय गत्यंतर नसलेचे सांगितले . भावीकांनी  ' पुंडलीक वरदा हारी विठ्ठल ' व ' ज्ञानोबा तुकोबा निळोबा ' चा नामघोस करत भजनाचा आनंद घेतला . दिंडी प्रमुख अशोक सावंत यांनी उत्तम नियोजन केले . संत निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर यांनी रथास जुंपलेल्या बैलांचे हिरडगाव पासूनचे खराब रस्त्यांमुळे अतोनात हाल झालेचे सांगीतले.
फोटो - इंदापुर येथील सरडे लॉन्समध्ये हभप महेश महाराज यांचे किर्तन प्रसंगी जनसमुदाय
 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!