शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी- कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.त्यातच राज्यात नवीन समीकरण तयार झाल्यामुळे ग्रामीण भागात वातावरण रंगू लागले आहे.
कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे टाकळी हाजी कवठे येमाई जिल्हा परीषद गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सध्या प्रत्येक इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. स्वतःची प्रसिध्दी स्वतः करून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडींची सोशल मीडिया द्वारे प्रसिध्दी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परीषद सदस्य पदासाठी राजेंद्र गावडे, दामुशेठ घोडे,भाजपाकडून सावित्रा थोरात,शिवसेनेकडून डॉ.सुभाष पोकळे,शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे या चारही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहे. तर पंचायत समिती सदस्य पदासाठी तुकाराम ऊचाळे,बिपिन थिटे इच्छुक आहे.त्यामुळे या गटात राजकिय वातावरण चांगलेच तापले असून आता जिल्हा परिषदेसाठी चौरंगी लढत होणार का? तसेच या चौरंगी लढतीमुळे मतदारांपुढे डोकेदुखी वाढणार असून मते कोणाच्या पारडयात जाणार याकडे लक्ष लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून कोणाला उमेदवारी मिळणार,उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे टाकळी हाजी कवठे येमाई जिल्हा परीषद गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सध्या प्रत्येक इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. स्वतःची प्रसिध्दी स्वतः करून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडींची सोशल मीडिया द्वारे प्रसिध्दी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परीषद सदस्य पदासाठी राजेंद्र गावडे, दामुशेठ घोडे,भाजपाकडून सावित्रा थोरात,शिवसेनेकडून डॉ.सुभाष पोकळे,शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे या चारही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहे. तर पंचायत समिती सदस्य पदासाठी तुकाराम ऊचाळे,बिपिन थिटे इच्छुक आहे.त्यामुळे या गटात राजकिय वातावरण चांगलेच तापले असून आता जिल्हा परिषदेसाठी चौरंगी लढत होणार का? तसेच या चौरंगी लढतीमुळे मतदारांपुढे डोकेदुखी वाढणार असून मते कोणाच्या पारडयात जाणार याकडे लक्ष लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून कोणाला उमेदवारी मिळणार,उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.