बालकाना दर्जेदार शिक्षणा बरोबर सुसंस्काराची जोड हवी-प्राचार्य एम. टी. कुंभारकर

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
   कोरेगांव भिमा (ता.शिरुर) श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने बालदिनाच्या औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुंभारकर बोलत होते.  
पंचायत समिती माजी सदस्य पी. के. गव्हाणे, बबनराव गव्हाणे , अप्पासाहेब फडतरे, सुनिल सव्वाशे, सुनिल नांदगुडे,  रामदास गव्हाणे, विजय देशमुख, मारुती धुमाळ, आदी उपस्थित होते. 
     कुंभारकर म्हणाले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो यातून बालकांचे महत्व अधोरेखित होते. आई वडील मुलांसाठी किती कष्ट घेतात या पेक्षा संस्कार काय करतात यास महत्व आहे. तुमचा प्रतेक दिवस प्रत्येक क्षण मुलांसाठी महत्वाचा आहे.
     दहावी बारावी प्रथम आलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी श्री हनुमान ची आरती मान मुलांना देण्यात आला .के. डी. गव्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सतिश जंगम यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!