सुनील भंडारे पाटील
बकोरी (तालुका हवेली) येथील अतिशय कष्टाने उभी केलेली वनराईला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झालो असून सुमारे 4000 झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत शिवाय झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचे पाईप देखील जळून खाक झाले, आज वनराईत अज्ञात समाज कंटकांनी आग लावली खुप मोठे नुकसान झाले ४००० झाडांचे नुकसान झाले २५ बंडल ठीबकचे पाईप जळुन खाक झाले अनेक पक्षांची घरटी, सरपटणारे प्राणी जळुन खाक झाले .त्याठिकाणी वनविभागाचे शिवले, डॉ.राठोड अकॅडमीचे सैनिक, धनराज, त्याठिकाणी नियमित काम करणारे कामगार वामण व मी स्वतः आग आटोक्यात आनली अन्यथा संपूर्ण झाडे जळाली असती त्याठिकाणी नेहमीच अशाप्रकारे आग लावली जाते दारुड्यांचा वावर त्या परीसरात असतो लोणिकंद पोलीसांनी त्याठिकाणी गस्त घातली तर नक्कीच अशे प्रकार कमी होतील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी राज्य माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून बकोरीच्या डोंगरावर विविध वन्य झाडांचे वृक्षारोपण करून संपूर्ण डोंगर हिरवा गार केला होता परंतु अज्ञाताने या ठिकाणी लावलेल्या आगीमुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान झाले असून वारघडे यांना अक्षरशा अश्रू अनावर झाली, अनेक वर्षांच्या कष्टाचे राख झाल्याची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे,