ग्रामीण भागात उष्णतेचा पारा चढला - उन्हाची लाहीलाही

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
             पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून उन्हाळ्या मधील उष्णता खूपच वाढली असून, सकाळी 9:00 वाजताच उन्हाचा चांगला चटका बसत आहे, त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले आहे,           
  ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीत दिवसभरात उन्हाळा ऋतू मधील उन्हाचे प्रमाण खूपच वाढले असून दुपारी उन्हाची तीव्रता प्रदीर्घ असल्याने घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल झाले आहे, तसेच शेतकऱ्यांना शेती कामामध्ये देखील उन्हाच्या तीव्रतेचा खूप मोठा परिणाम झाला असून, शेत कामे फक्त सकाळी करता येत आहेत, दुपारच्या वेळी सूर्यदेवता आग ओकत असल्याने महामार्ग वाहतुकीवर देखील परिणाम होत असून गर्दी कमी होत आहे, तसेच, अंतर्गत गाव रस्त्यांवर प्रवाशांचा शुकशुकाट होत आहे, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अचानक उष्णतेची लाट उसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, मे व जून महिना कसा पास होईल याची चिंता नागरिकांना लागली आहे, उन्हाच्या तीव्रतेचा व्यवसायावर परिणाम होत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!