सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव आज पासून सुरुवात झाली, या उत्सवातील प्रमुख आकर्षण शेतकऱ्यांची जान बैलगाडा शर्यतीमध्ये हवेली तालुक्यातील आष्टापूर येथील साईराज दिलीप कोतवाल यांच्या गाड्याने 11.76 सेकंदात घाट पार करून एक नंबरची बारी मिळवली,
आज सोमवार, आणि उद्या मंगळवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज जोरदार सुरुवात झाली, सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये अभिषेक व महापूजा करण्यात आली, त्यानंतर 9:00 वाजता, श्री नरेश्वर महाराज मंदिर घाट सणसवाडी येथे सुरू झालेल्या बैलगाडा घाटामध्ये सुमारे 180 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये साईराज दिलीप कोतवाल (अष्टापूर), शरद पदानराव दरेकर(सणसवाडी), लक्ष्मण रामचंद्र खांदवे(लोहगाव) यांच्या गाड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला,
तसेच द्वितीय क्रमांक रुद्रांश आशिष खेडकर(शिक्रापूर), समाधान बाळासाहेब जाधव(वडगाव शिंदे), यांच्या बैलगाड्याने पटकावला, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक कृष्णा रोहिदास ढेरंगे(कोरेगाव भीमा), तर चतुर्थ क्रमांक शिवराज विवेक हरगुडे(सणसवाडी) यांच्या बैलगाड्याने पटकावला,
घाटाचा राजा म्हणून कृष्णा रोहिदास ढेरंगे तर लक्ष्मण रामचंद्र खांदवे(लोहगाव), अजय प्रकाश काटकर(साबळेवाडी),आशाताई प्रदीप काशीद(कोरेगाव भीमा), अथर्व दादासाहेब वाळके(पेरणे)यांच्या बैलगाड्यांना फळीफोड हा बहुमान मिळाला, विजेत्या बैलगाड्यांना सायंकाळी 7:00 वाजता आकर्षक बक्षीस वाटप करण्यात आले, रात्री 8:00 वाजता श्री भैरवनाथ महाराज काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती, श्री भैरवनाथ यात्रा कमिटी वढु बुद्रुकच्या वतीने अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे,