विवाहितेच्या गळा आवळून खून..आळंदी पोलीसांकडून तपासाची सूत्रे फिरणार

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
        खेड तालुक्यातील मरकळ या ठिकाणी रविवारी (दि.१) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास हुंडाबळीची घटना घडली आहे. विवाहितेचा माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार छळ करण्यात आल्याची माहिती फिर्यादीमध्ये देण्यात आलेली आहे. मच्छिंद्र अर्जुन भारती वय 26 रा.जांभूळ ता.मावळ यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.                     त्यानुसार विजय प्रल्हाद गिरी वय 32 रा. मरकळ ता. खेड मूळ गाव रा.राजापूर ता.गेवराई जि. बीड आणि त्याची आई वय 60 वर्ष रा.राजापूर ता.गेवराई जि. बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार फिर्यादी यांच्या बहिणी कडे आरोपी आणि त्याची आईकरत  होते आरोपी व त्याची आई घर बांधण्यासाठी एक लाख रुपये घेऊन येण्याची विवाहितेकडे मागणी करत होते. तसेच घरामध्ये नवीन वस्तू घ्यायची आहेत. याचाही तगादा विवाहितेकडे वारंवार आरोपी आणि आरोपीची आई हे करत होते.फिर्यादी यांच्या बहिणीचे विजय यांचेशी 14 जुलै 2013 रोजी विवाह झाला होता.लग्नाच्या एक वर्षानंतर फिर्यादी यांच्या बहिणीला विजय प्रल्हाद गिरी आणि त्याच्या आईने त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपी विजय याने विवाहितेचा रात्री सव्वा दोनच्या सुमारास रविवारी मरकळ येथे राहत असलेल्या घरी कशाने तरी गळा आवळून खून केल्याची फिर्याद मच्छिंद्र अर्जुन भारती यांनी दिली आहे.आरोपी विजय प्रल्हाद गिरी रा.मरकळ ता.खेड मूळ गाव राजापूर ता.गेवराई जि.बीड व त्याची आई मुळगाव राजापूर ता गेवराई जि बीड यांचे विरोधात दिली आहे. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!