आळंदी अर्जुन मेदनकर
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा आषाढी यात्रेस राज्यासह परिसरातून आळंदीत खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशी माळ,कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करीत आलेल्या लाखो भाविक, वारकरी यांचे नामजयघोषात वैभवी पालखी सोहळ्याने विना मंडपातून हरिनाम गजरात सायंकाळी सुमारे एक तास उशिरा सातचे सुमारास प्रस्थान झाले. प्रथा परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा एक दिवसाचे मुक्कामास दर्शनबारी मंडप गांधी वाड्यात विसावला. आळंदीत एक मुक्काम घेत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामास पुण्याकडे रविवारी ( दि. ३० ) भल्या पहाटे मार्गस्थ होईल.
आषाढी पायी वारीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्यास राज्य परिसरातून लाखो भाविक हरिनाम गजर करीत दिंड्यादिंड्यातून आळंदीत दाखल झाले होते. यावर्षी अधिकचे भाविक यात्रेत सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. आळंदी प्रस्थान काळात आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना देखील गैरसोयीस सामोरे जावे लागू नये यासाठी नियोजन केले होते. आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरात राहून सुरक्षित पणे आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची पर्वणी मिळाली.
या प्रस्थान सोहळ्यास प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अमोल कोल्हे, संजय उर्फ बंडू जाधव, श्रीरंग बारणे, उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त अँड राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, विश्वस्त भावार्थ देखणे, आळदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी भीमा नरके, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, मानकरी योगीराज कु-हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, योगेश आरु, अनिल कु-हाडे, फडकरी, दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांचा देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी वारकरी भाविकांचे सोबत फुगडी खेळात सोहळ्यात सहभागी झाले. इंद्रायणी नदी घाटावर जात पाहणी केली. चाकण चौकात सीशोभीकरणाचे उदघाटन केले.
प्रस्थान दिनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी, यशोदीप जोशी, महेश जोशी, तुषार प्रसादे, योगेश चौधरी, प्रसाद जोशी, मंदार जोशी यांनी केले. प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात झाले. यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी हि मार्गदर्शन केले. यावर्षी गर्दी वाढेल या शक्यतेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांची प्रस्थान काळात गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत नगरपरिषद, आरोग्य, महसूल, वीज महावितरण व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान सोहळा पाडला. प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले.
यासाठी पोलीस मित्र वेल्फेअर फौंडेशन ऑफ इंडिया अध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा अध्यक्ष योगेश जाधव, पोलीस मित्र युवा महासंघ पोलीस मित्रानी देखील खूप सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला. यासाठी पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी काम पाहिले. आळंदीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रींना महानैवेद्य झाला. प्रस्थांचे सोहळ्यास सुरुवात होण्यापूर्वी देवस्थानचे सेवक, कर्मचारी, स्वकाम सेवक, स्वयंसेवक यांनी स्वच्छता सेवक यांचे माध्यमातून स्वच्छतेची सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा प्रभावी पणे अल्प वेळेत स्वच्छ केला. यावर्षी पायी वारी पालखी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी ही परंपरेने सुरुवात झाली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ आणि त्यातील ९ उपपोट दिंड्यातील प्रत्येक दिंडीतील फक्त ९० दिंडीकरी यांना मंदिरात प्रस्थान सॊहळ्यासाठी देऊळवाड्यात परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील मर्यादित प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माऊलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्या नंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माऊलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माऊलींच्या संस्थान तर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आलेल्या पालखीत विराजित झाल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिण हरिनाम गजरात झाली. श्रींची वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत ठेवून विधिवत करण्यात आली. दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ श्रींची पालखी खांद्यावर घेऊन मिरवण्यास उत्सुक झाले.
आळंदी ग्रामस्थाना दोनशे खांदेकरी पास देण्यात आले होते. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी माऊली माऊली नामजयघोष करीत खांद्यावर उचलीत माऊलींच्या पायी वारीला जाण्यास वीणा मंडपातून श्रींचे पालखी सोहळ्याचे वैभवी लवाजम्याने सायंकाळी पंढरी कडे प्रस्थान ठेवले. माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्या नंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या.
यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषित झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट, आकर्षक रंगावली, मंदिरात व इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने विविध लोकशिक्षण पार कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिकली. भाविकांनी यावर्षीचे सोहळ्याचा आनंद ऊन सावळ्या तसेच वरुणराजाची हलक्याश्या सरींचा अनुभव घेत सोहळ्याचा आनंद लुटला. यावर्षी आल्हाददायक वातावरणात सोहळ्याचे प्रस्थान पार पडले.
श्रींचे नगरखान्याचे मानकरी बाळासाहेब भोसले यांनी श्रींचे पालखी प्रस्थान साठी लक्षवेधी नगारखाना सजविला. श्रीचे पालखी रथ ओढण्यासाठी यावर्षीची सेवा सहादु कुऱ्हाडे वस्ताद यांनी रुजू केली आहे. श्रींचे वैभवी पालखी रथाला शोभेल अशी आकर्षक बैलजोडी ने रथासह सोहळ्याचे वैभव वाढविले यासाठी बाजी आणि हौश्या ही बैलजोड यावर्षीची पालखी रथ ओढण्याची सेवा देणार आहे. श्रींचे सोहळ्यात चवरी ढाळण्याची सेवा योगीराज कुऱ्हाडे यांचे कडे तर अबधगिरी सेवा योगेश आरू, आरतीचे मानकरी अनिल कुऱ्हाडे यांचे कडे आहे.
परंपरेने श्रींचे सोहळ्यात चोपदार बाळासाहेब रणदिवे यांची सेवा रुजू होत आहे. श्रींची कोठी सजावट व जमवाजमव अगदी मिठा पासून मिरची, हळद, हिंग, मोहरी, सुई दोरा, रथाचे नियोजन पर्यंत वारी सोहळ्यासाठी आवश्यक साहित्य व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी रुजू केली आहे.
आळंदी ते पंढरपूर पायी वारी साठी वारकऱ्यांना मोफत औषध सेवा देण्या करीता रुग्णवाहिकेचे पूजन ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त योगी निरंजन नाथ व पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफळकर व अलंकापुरी प्रतिष्टान चे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते,
पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन ऑफ़ इंडिया चे अध्यक्ष शिवाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष योगेश जाधव, पोलीस मित्र युवा महासंघ अध्यक्ष प्रवीण बोबडे, ज्योती पाटील यांनी ही पोलीस मित्र सेवा रुजू करीत भाविकांचे सेवारत झाले. आळंदी दिघी वाहतूक पोलिस विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी प्रस्थान काळात सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले. अधीकारी, पोलीस कर्मचारी यांनी आषाढी वारी निमित्त बंदोबस्त पाहाणी करीत मार्गदर्शन केले.